Kalichya Prabhavatun Mukt Karnara - Sacchidananda Utsav
ll Hari Om ll
"श्रीरामाची नीति, श्रद्धा व पावित्र्य हयांच्या त्रिवेणी संगमातून शिवधनुष्याला झालेला स्पर्श म्हणजे सच्चिदानंद उत्सवाची नांदीच."
................. ShriRamrasayan, page no. 32
"भगवंत स्वत: सच्चिदानंद म्हणजेच सत्य, प्रेम व आनंदमय आहे आणि म्हणूनच विश्वातील प्रत्येक मानवाने आनंदमय बनावे व सतत प्रगतीपथावर रहावे अशीच त्याची इच्छा असते. त्यामुळेच तो जे जे काही घडवून आणतो ते मानवाला प्रगतीपथावर नेणारे, त्याचा विकास करणारे आणि म्हणूनच आनंदाकडेच वाटचाल करविणारे असते."
Trutya Khand
Anandsadhana
Page No. 42
"श्रीमद्पुरुक्षार्थप्रणित ' ससाधना ' ही उपासकाला भगवंताच्या सच्चिदानंद स्वरुपाची ओळख करून , देणारी , परमात्म्याचे प्रेम व कृपा सहजपणे प्राप्त करून देणारी व भगवंताचे सख्यत्व देत सर्व भेद व अज्ञान दूर करणारी अशी एकमेव अद्वितीय सर्वोच्च साधना आहे व ती परमात्म्याच्या प्रतिमेच्या आधारानेच गगनापर्यंत वाढत जाऊन संपूर्ण ब्रह्मांडाला गवसणी घालते."
.......... ShriMadpursharatha Grantharaj,
Trutya KhandAnandsadhana
Page No. 66

"सोप दे बापूके चरणों मे
अपना जीवन अपनेपनसे
तेरा क्या हे क्या हे मेरा
सबकुछ तो उसका ही दिया हे
एक बार फीर सौंप के देखो
सच्चिदानंदु रूप को पाओ l l "
......... Gajar, Shri Harigurugram, 22/09/11
Like every year, Shraddhavan devotees can celebrate Shri Sacchidanand Utsav in the Margashirsha month by bringing home the Padukas of our beloved Sadguru Shree Aniruddha Bapu. These padukas are made from the paper pulp of the sacred Ramnaam books.
Shraddhavans can celebrate this Utsav starting from the second Saturday of Margashirsha month, i.e. from 22-Dec-2012 upto 23-Dec-2012 (one and half days) or upto 26-Dec-2012 (Five days).
...... Shree Aniruddha Upasana Foundation
"भरतास श्रीरामांच्या चरणांपासून दूर करणे कुणासही जमू शकत नाही .
अखेरीस परमदयाळू लक्ष्मण व वात्सल्यमूर्ति जानकी भरतास श्रीरामांच्या पादुका बरोबर घेऊन जाण्यास सांगतात.
हेच ते विश्वातील परमात्म्याच्या पादुकांचे पहिले पादुकापूजन."
................. ShriRamrasayan, page no. 91
श्रद्धावानांना अचिंत्यदान देणारा, स्वयं त्रिपुरारी त्रिविक्रम असणारा श्रद्धावानांच्या
उखर मनोभूमीत फुलबाग फुलविणारी श्रद्धावानांना त्रिविध तापातून मुक्त करणारा
सच्चिदानंद म्हणजेच परमपूज्य सदगुरु श्री अनिरुद्ध.
........... Shri Gurushetram Patrika
सच्चिदानंद उत्सवाची ठळक वैशिष्टे:
१. जेव्हां मी सदगुरुच्या पादुका घरी आणुन त्याचे पूजन करतो तेव्हा माझ्या मनात सदगुरु प्रती, प्रेमभाव, कृतज्ञताभाव आणि शारण्यभाव वाढीस लागतो व सच्चिदानंद श्री अनिरुद्ध सक्रीय राहतो.
२. मार्गशीर्ष महिन्यात सच्चिदानंद उत्सव साजरा करताना आम्ही जे पादुका पूजन करतो, त्याने आमचा मार्ग, विकास मार्ग, सदगुरू प्राप्तीचा मार्ग व सदगुरू प्रेम प्रवास मार्ग सुकर होतो. देवयान मार्गाच्या शिर्षात्वापर्यंत घेऊन जाणारा मार्गशीर्ष महिन्यातील हा सच्चिदानंद उत्सव म्हणजे श्रद्धावानांसाठी महा पर्वणीच.
३. त्रिपुरारी त्रिविक्रम असलेले सदगुरु श्री अनिरुद्ध माझ्या जीवनातील अशुभाचा नाश करून व शुभाचे संवर्धन करतात जेव्हा आम्ही प्रेमाने पादुका पूजन करतो तेव्हा आमच्या जीवनात त्रिपुरारी त्रिविक्रम असलेले सदगुरु श्री अनिरुद्ध सक्रीय होतो व माझ्या देहातील मन, प्राण, प्रज्ञा ह्या तिन्ही स्तरावरील अनुचितता दूर करून आमचा समग्र विकास घडवून आणतो. अर्थात जीवनात सच्चिदानंद उत्सव नित्यत्वाने साजरा होतो.
४. सच्चिदानंद उत्सवातील अथर्वस्तोत्र आमच्यातील चंचलतेचा नाश करून आम्हाला गुरूतेज प्रदान करतो व परमार्थ एकाचवेळी सुखाचा होतो.
........... Shri Gurushetram Patrika
........... Shri Gurushetram Patrika
मार्गशीर्ष महिन्यात श्रद्धावान सदगुरु पादुका पूजनाने श्री सच्चिदानंद उत्सव साजरा करतात त्याबाबतची कथा बघूया.
द्वापारयुग संपलं आणि कलियुगाला प्रारंभ झाला. कलियुगाच्या सुरवातीलाच एक दिवशी श्रीकृष्ण भगवंत, रुक्मीणी माता व बलराम दादा गोप गोपी समवेत बसले होते इतक्यात सर्व गोपगोपी अचानक स्थिर झाले वारयाची गती थांबली. नदी, नाले, पक्षु, पक्षी, गोपगोपी एका जागेवर स्थिर झाले. सर्वांची हालचाल थांबली, हल्ली ज्याला आपण statue position म्हणतो तशी आणि त्यामुळे स्थितीमध्ये फक्त श्रीकृष्ण भगवंत, रुक्मीणी माता व बलराम दादा होते. हे द्रुष्य बघून बलराम दादा चिंतीत झाले व त्याने रुक्मीणी मातेला प्रार्थना केली की, माते सृष्टीवर आलेल्या संकटापासून तूच वाचवू शकतेस, माझे सर्व गोपगोपीकेचे रक्षण कर. त्यावर रुक्मीणी माता म्हणते, अरे बलराम दादा, प्रत्यक्ष श्रीकृष्ण भगवंत उपस्थित असतांना मी रे काय करणार! तुचं भगवंताला प्रार्थना कर. त्यावर बलराम दादा म्हणतात माते भक्तीच भगवंताला प्रसन्न करते म्हणून तुचं भगवंताला प्रार्थना कर. बलराम दादाच्या प्रार्थने प्रमाणे रुक्मीणी माता श्रीकृष्ण भगवंताला प्रार्थना करते कि हे भगवंत गोपगोपीवर आलेल्या संकटाचे आपण निवारण करावे.
रुक्मीणी मातेने प्रार्थना करताक्षणीच श्रीकृष्ण भगवंत आपल्या उजव्या पायाचा अंगठा क्षणिक हलवितात व त्याक्षणी गोपगोपीची अन्य सर्वांची हालचाल पुर्ववत झाली, त्याने श्रीकृष्ण भगवंत सांगतात की आपण आता जर सर्वांची स्थिती बघितली ती कलियुगातील आहे. कलियुगामध्ये सर्वांची गती कली रोखू शकतो , मात्र जे भगवंताला शरण जातील त्याची गती कली रोखू शकत नाही व शकणारही नाही.
भगवंताच्या मुखातील हे वचन ऐकता क्षणीच रुक्मीणी माता भगवंताला प्रार्थना करते की हे भगवंत , कलियुगात भक्ताचे रक्षण होण्यासाठी एखादे व्रत सांगा, एखादा उपवास सांगा जेणे करून भक्त गण कलीच्या प्रभावापासून दूर राहातील. रुक्मीणी मातेने केलेली प्रार्थना ऐकून कृष्ण भगवंत सांगतात की आजचा दिवस हा मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा शनिवार आहे ह्या दिवशी जो कोणी सदगुरूंच्या पादुकांचे आपल्या घरी आणून पुजन करील त्याची गती कली थांबवू शकत नाही हे माझे वचन आहे. म्हणून मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा शनिवारी आपण सदगुरु श्री अनिरुद्धांच्या पादुकांचे घरी पूजन करतो, म्हणजेच श्री सच्चिदानंद उत्सव.
........... Shri Gurushetram Patrika
ll Hari Om ll
ShriRam
ReplyDelete